Skip to main content

Posts

एका दिवसासाठी विद्यार्थी शिक्षक झाले… आणि त्यांना शिक्षक होण्याचा खरा अर्थ समजला!

५ सप्टेंबर – शिक्षक दिन. शिक्षक दिन म्हटले की शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, शुभेच्छा देणे आणि विविध उपक्रम आयोजित करणे हे नेहमीचेच. मात्र यावेळी विद्यार्थ्यांना शिक्षकाची भूमिका प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी देण्यात आली. काही विद्यार्थ्यांनी ‘विद्यार्थी शिक्षक’ म्हणून वर्गात उभे राहून आपल्या मित्र-मैत्रिणींना शिकवण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी आधी तयारी केली. विषय समजून घेतला, तो इतरांना कसा समजावून सांगायचा याचा विचार केला आणि ज्ञानासोबत संस्कार व विविध मूल्ये विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला, त्यांचा छोटेखानी सत्कार करून त्यांना पेन देण्यात आले. हा पेन केवळ सत्काराचे प्रतीक नव्हता, तर त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक आणि भविष्यात अशाच विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी मिळालेली प्रेरणा होती. पण खरी शिकवण वर्ग संपल्यानंतर मिळाली… कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांना एकत्र घेऊन शिक्षक दिनाचे महत्त्व, शिक्षकांचे अनुभव आणि विद्यार्थी शिक्षकांनी घेतलेले अनुभव यावर संवाद साधण्यात आला. विद्यार्थी शिक्षकांनी आपले अनुभव सांगताना काही अत्यंत म...

शूजमध्ये लपवलेला मोबाईल… आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न!

आज बारावी विज्ञान शाखेच्या मध्यसत्र परीक्षेदरम्यान घडलेल्या एका प्रसंगाने मनात अनेक प्रश्न निर्माण केले. परीक्षा सुरू असताना एका विद्यार्थिनीने मोबाईलचा वापर करून कॉपी केल्याची माहिती एका विद्यार्थिनीने दिली. त्यानंतर मुलींची तपासणी करण्यासाठी मॅडम आल्या. सर्व मुलींची तपासणी करण्यात आली. ज्या विद्यार्थिनीबद्दल इतर विद्यार्थिनींनी माहिती दिली होती, तिला अनेक वेळा विचारण्यात आले. मात्र तिने मोबाईल असल्याचे मान्य केले नाही. तपासणी करण्यात आली; पण मोबाईल शूजच्या सोलच्या खाली लपवलेला असल्यामुळे तपासणीत सापडला नाही. त्यामुळे तिला परीक्षा हॉलच्या बाहेर सोडण्यात आले. मात्र बारावी विज्ञानची मध्यसत्र परीक्षा संपल्यानंतर काही विद्यार्थिनींनी सांगितले की, तिच्या शूजच्या सोलच्या खाली मोबाईल लपवलेला होता. ही घटना एका विद्यार्थिनीपुरती मर्यादित नाही. उलट ती आपल्यासमोर शिक्षणव्यवस्थेशी संबंधित अनेक गंभीर प्रश्न उभे करते. विद्यार्थ्याला कॉपी करण्याची गरज का वाटते? चूक करूनही ती मान्य न करण्याची मानसिकता कुठून येते? गुणांसाठी खोटे बोलण्याची ताकद कुठून येते? आणि सर्वात महत्त्वाचे—या प्रवृत्तीचा फटका कोणा...

पालक हतबल का होत आहेत?

“सर, आम्ही त्याच्यासाठी एवढं करतो… पण तो आमचं ऐकतच नाही.” हे वाक्य ऐकायला साधं आहे. पण या एका वाक्यामागे अनेक पालकांची अस्वस्थता, चिंता आणि असहायता दडलेली आहे. पालक मुलाला चांगले शिक्षण मिळावे म्हणून कष्ट करतात. त्याच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. स्वतःच्या अनेक इच्छा बाजूला ठेवतात. मुलाने आपल्यापेक्षा चांगले आयुष्य जगावे, ही त्यांची मनापासून इच्छा असते. पण एक दिवस त्यांना जाणवते— मुलगा मोठा झाला आहे; मात्र त्याच्याशी संवाद साधण्याचा मार्ग आपण हरवला आहे. तेव्हा पालक हतबल होतात. समस्या नेमकी कुठे आहे? आजच्या पालकांसमोरची समस्या केवळ “मुलगा अभ्यास करत नाही” एवढी राहिलेली नाही. मुलगा किती वेळ मोबाईल वापरतो? तो कोणासोबत वेळ घालवतो? त्याला सोशल मीडियावर काय दिसते? त्याच्या मनात कोणती स्वप्ने आहेत? तो पालकांशी मोकळेपणाने बोलतो का? या प्रश्नांची उत्तरे अनेक पालकांना माहीत नसतात. कारण घरात संवाद असतो; पण अनेकदा तो सूचनांचा संवाद असतो. “अभ्यास कर.” “मोबाईल ठेव.” “वेळेवर घरी ये.” “त्या मुलांसोबत जाऊ नको.” “परीक्षा जवळ आली आहे.” पालक बोलत असतात. पण मुलगा ऐकत नसतो. आणि हळूहळू दोघांमध्ये अं...

अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अंशतः अनुदानित माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांची २०२४-२५ पटपडताळणी शिबीराचे आयोजन.

दिनांक ३१ ऑक्टोबर २०२४:  अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अंशतः अनुदानित माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांची २०२४-२५ पटपडताळणी शिबीराचे आयोजन. शासन निर्णय 14.10.2024 आणि शिक्षण उपसंचालक पुणे विभाग यांचे दिनांक 30. 10. 2024 रोजी चे पत्र यानुसार शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अहिल्यानगर यांनी अंशतः अनुदानित माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांची पटपडताळणी शिबिराचे आयोजन केलेले आहे. या संबंधात अहिल्यानगर जिल्ह्यातील माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय यांचे मुख्याध्यापक प्राचार्य यांना संबंधित परिपत्रक देण्यात आलेले आहे त्यानुसार पटपडताळणी शिबिराचे कामकाज होणार आहे संबंधितांनी सर्व माहिती दिलेल्या सूचनांप्रमाणे वेळेमध्ये सादर करण्यास सांगितले आहे.

गाणगापूर राहण्याची व जेवण्याची सोय|Gangapur

Temple Temple at Triveni Sangam Triveni Sangam ST Bus Stand, Chauk, Way to Triveni sangam, Way to Shri Datta Bhakt Niwas Near to ST Bus Stand Gangapur at walking distance Shri Datta Bhakt Niwas Parking Rooms Mahaprasadalay Gruh Mahaprasad Free, there are choice if you want to donate to trust. Room Rent near 1000Rs per Day. Season to season maybe varies. गाणगापूर येथे राहण्याची व जेवणाची सोय – भक्तांसाठी उपयुक्त माहिती गाणगापूर हे दत्तभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचे धार्मिक क्षेत्र मानले जाते. दरवर्षी महाराष्ट्रासह विविध राज्यांतून भाविक येथे दर्शनासाठी येतात. विशेषतः श्री दत्तात्रेयांच्या पवित्र क्षेत्राला भेट देताना दर्शनासोबतच राहण्याची सोय, भोजनाची व्यवस्था, प्रवास आणि आवश्यक नियोजन याबाबत माहिती असणे उपयुक्त ठरते. गाणगापूरला एक दिवसाची किंवा दोन दिवसांची यात्रा करण्याचा विचार असल्यास खालील माहिती प्रवासाचे नियोजन करण्यासाठी उपयोगी ठरू शकते. गाणगापूरमध्ये राहण्याची सोय गाणगापूर परिसरात भाविकांच्या सोयीसाठी विविध प्रकारच्या निवासाची व्यवस्था उपलब्ध असते. यात्रेच्या कालावधीनुसार आणि ...

मला कधी कळलेच नाही..

मला कधी कळलेच नाही... मी ज्यांना आपले मानले, त्यांनीच माझ्या पाठीवर वार केले. काहीतरी चुकीचे घडत आहे, हे जाणवत होते; अनेक गोष्टी समजत होत्या. पण ज्यांना आपले मानले होते, त्यांना दुखवायचे नव्हते. म्हणून मी शांत राहिलो. पाठीत घाव होत राहिले. विश्वासघातालाही लाज वाटावी, अशी काही कृत्ये माझ्यासमोर घडत होती. सगळे समजत असूनही मी गप्प राहिलो. कारण माझ्या मनात कोणाचे वाईट करण्याची इच्छा नव्हती. काही पुरावे मिटवले जात होते, काही गोष्टी जाणीवपूर्वक लपवल्या जात होत्या. पण नशिबाच्या लेखणीने लिहिलेला हिशोब कुणालाही पुसता येत नाही, हेही हळूहळू जाणवत गेले. पडद्यामागे काही जण आपल्या बुद्धीचा, चातुर्याचा आणि ताकदीचा वापर करून मला नामोहरण करण्याचे प्रयत्न करत होते. अंधारातून वार होत होते; प्रत्येक हालचाल जाणवत होती. तरीही मी शांत राहिलो. कारण मला कोणाला दुखवायचे नव्हते. या सगळ्याचा परिणाम मनावर होत होता. रात्र-रात्र झोप लागत नसे. मन अस्वस्थ होत असे. उर भरून येत असे. नको नको ते विचार मनात येत. ज्यांना आपले समजले, त्यांच्याकडूनच असा घात होऊ शकतो, हे स्वीकारणे सोपे नव्हते. अशा वेळी माझ्या लेकराचे...