मला कधी कळलेच नाही...
मी ज्यांना आपले मानले त्यांनीच मला कापले,
पाठीत घात होत होते हे सर्व समजत होते,
पण ज्यांना आपले मानले होते त्यांना दुखवायचे नव्हते,
पाठीत घाव होत राहिले,
विश्वासघातालासुद्धा स्वतः ची लाज वाटेल असे कृत्य होत राहिले,
समजत होतं सारे तरी पण मी शांत राहिलो,
मला कोणाला दुखवायचे नव्हते,
कागदाचे पुरावे मिटवले जात होते,
पण कपाळावरचे लिहिलेले त्यांना पुसता येत नव्हते,
त्याच्या पुढे होते ते हतबल,
समजत होतं सारे तरी पण मी शांत राहिलो,
मला कोणाला दुखवायचे नव्हते,
सर्व होताना दिसत होते, पडद्या मागे हुशार, चतुर, बुद्धिवान, मातब्बर, बलाढ्य, खोटारडे, भ्रष्ट, अविवेकी माणसं मला नामोहरण करण्यासाठी अनितिने डाव रचत होते,
अंधारातून पाठीवर सपा सप वार होत होते,
मला सर्व समजत होते तरी पण मी शांत राहिलो,
मला कोणाला दुखवायचे नव्हते,
रात्र रात्र झोप लागत नसे,
उर भरून येत असे,
मनात नको ते विचार येत असे,
आपले असे घात करता हे आता समजत असे,
लेकराच तोंड समोर दिसत असे,
त्यामुळे न पचनारी दुखः सुद्धा पचवायची ताकद तयार होत असे,
संकटात डगमगणारा मी, या कायमच्याच संकटांमुळे वादळाविरुद्ध उभी राहायची मानसिकता, ताकद मिळत असे,
राक्षसी प्रवृत्तीविरुद्ध लढण्यासाठी, कळत न कळत ते कोणत्या रूपात पाठीमागे कधी उभे राहिले हे कधी समजले नाही,
जो दुसऱ्याचे वाईट करतो, त्याचे वाईट करण्याची माझी कधी इच्छा झाली नाही,
शेवटी हिशोब करणारा तो, कोणत्या ना कोणत्या रूपाने खरंच व्याजासह हिशोब करतो हे अनुभवले मी.
खरच माणसे ओळखायला मला कधी कळलेच नाही...
Comments
Post a Comment