“सर, आम्ही त्याच्यासाठी एवढं करतो… पण तो आमचं ऐकतच नाही.” हे वाक्य ऐकायला साधं आहे. पण या एका वाक्यामागे अनेक पालकांची अस्वस्थता, चिंता आणि असहायता दडलेली आहे. पालक मुलाला चांगले शिक्षण मिळावे म्हणून कष्ट करतात. त्याच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. स्वतःच्या अनेक इच्छा बाजूला ठेवतात. मुलाने आपल्यापेक्षा चांगले आयुष्य जगावे, ही त्यांची मनापासून इच्छा असते. पण एक दिवस त्यांना जाणवते— मुलगा मोठा झाला आहे; मात्र त्याच्याशी संवाद साधण्याचा मार्ग आपण हरवला आहे. तेव्हा पालक हतबल होतात. समस्या नेमकी कुठे आहे? आजच्या पालकांसमोरची समस्या केवळ “मुलगा अभ्यास करत नाही” एवढी राहिलेली नाही. मुलगा किती वेळ मोबाईल वापरतो? तो कोणासोबत वेळ घालवतो? त्याला सोशल मीडियावर काय दिसते? त्याच्या मनात कोणती स्वप्ने आहेत? तो पालकांशी मोकळेपणाने बोलतो का? या प्रश्नांची उत्तरे अनेक पालकांना माहीत नसतात. कारण घरात संवाद असतो; पण अनेकदा तो सूचनांचा संवाद असतो. “अभ्यास कर.” “मोबाईल ठेव.” “वेळेवर घरी ये.” “त्या मुलांसोबत जाऊ नको.” “परीक्षा जवळ आली आहे.” पालक बोलत असतात. पण मुलगा ऐकत नसतो. आणि हळूहळू दोघांमध्ये अं...
विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि सर्वांसाठी उपयुक्त माहितीचे विश्वासू व्यासपीठ! शिक्षण, Career Guidance, आरोग्य, प्रवास-पर्यटन तसेच अकोले, संगमनेर व परिसरातील उपयुक्त माहिती एका ठिकाणी. ज्ञान • मार्गदर्शन • अनुभव • माहिती