दहावी-बारावीनंतर पुढे काय? Career निवडताना ‘वर्तमान-भविष्याचा वेध आणि निरीक्षण’ किती महत्त्वाचे? दहावी किंवा बारावीची परीक्षा पूर्ण झाली की विद्यार्थी आणि पालकांसमोर सर्वात महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो—“आता पुढे काय करायचे?” कोणता Course घ्यायचा? कोणत्या शाखेत प्रवेश घ्यायचा? Government Job करायची की Private Job? Engineering, Medical, Agriculture, Pharmacy, Commerce, Arts, Law, Management, IT किंवा आणखी कोणते क्षेत्र निवडायचे? Career निवडताना विद्यार्थ्याची आवड, क्षमता, कौशल्ये आणि शैक्षणिक कामगिरी यांचा विचार करणे आवश्यक आहेच. पण त्यासोबत आणखी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न स्वतःला विचारायला हवा— “ज्या क्षेत्रात मला Career करायचे आहे, त्या क्षेत्रातील वर्तमान आणि भविष्यातील संधींचा मी अभ्यास केला आहे का?” फक्त आजच्या संधी पाहून Career निवडू नका अनेक वेळा पालक आणि विद्यार्थी सध्या ज्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध आहेत, त्या क्षेत्राकडे आकर्षित होतात. हे काही प्रमाणात योग्य आहे. परंतु आज एखाद्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात Jobs आहेत म्हणजे पाच-दहा वर्षांनंतरही त्याच...
विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि सर्वांसाठी उपयुक्त माहितीचे विश्वासू व्यासपीठ! शिक्षण, Career Guidance, आरोग्य, प्रवास-पर्यटन तसेच अकोले, संगमनेर व परिसरातील उपयुक्त माहिती एका ठिकाणी. ज्ञान • मार्गदर्शन • अनुभव • माहिती