दहावी-बारावीनंतर पुढे करियर निवडताना कोणकोणत्या मुद्यांवर विचार-मंथन केले पाहिजे? त्यातील आज आवड याविषयी थोडक्यात माहिती घेऊ या.
दहावी-बारावीनंतर
पुढे करियर निवडताना कोणकोणत्या मुद्यांवर विचार-मंथन केले पाहिजे? त्यातील आज आवड याविषयी थोडक्यात माहिती घेऊ या.
इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा पास झाल्यानंतर पुढे कोणत्या क्षेत्रामध्ये
करियर करायचे? हा दिव्य प्रश्न विद्यार्थी-पालक यांना पडलेला
असतो. हा प्रश्न सोडवताना काही महत्वाच्या मुद्यांवर विद्यार्थी-पालक यांचे
विचार-मंथन झाले तर हा प्रश्न सुटण्यासाठी मदत होऊ शकते. त्या संदर्भात काही
महत्वाच्या मुद्यांवर आपण थोडक्यात बघूयात. आवड : करिअर निवडताना पहिला प्रश्न,
आपल्याला कोणते काम करण्यास आवडते? कारण
भविष्यात आपण सर्व शिक्षण घेणार, खाजगी किंवा सरकारी नोकरी
मिळविणार, तेथे आपल्याला पगार चांगला असणार, पण त्यावेळेस काम करताना जर आपल्याला ते काम करण्याची आवड जर नसेल तर पैसे
मिळत असताना ते काम करण्याची इच्छा, आवड राहत नाही, इतरांना दोष देणे असे विविध प्रश्न तयार होतात व पुन्हा करियर बदलण्याचे
विचार येतात परंतु तेंव्हा वय जास्त झाले असताना पुन्हा नवीन करियर घडविण्याच्या
दृष्टीने नवीन शिक्षण घेणे अवघड होते परंतु तरी देखील जिद्द, चिकाटी, ध्येय गाठण्याची इच्छा असेल तर हा खडतर
प्रवास करुन काही वेळेस अपेक्षित यश मिळवता देखील येते परंतु त्यादरम्यान होणार
मनस्थाप, गेलेला वेळ, पैसा, आणखी भरपूर काही. त्यामुळे करियर निवडताना आपल्या आवडीचे निवडा किंवा जे
निवडले आहे त्यात उच्चस्तरावर जाण्याचा प्रयत्न करा, गुणवत्ता
ठेवा, आणि आहे त्यात समाधानी राहा. यात आणखी देखील मुद्दे
समाविष्ट करू, आपल्याला काय वाटते ते आपण कॉमेंट्स बॉक्स
मध्ये टाईप करु शकता, आपल्या विचार इतरांना प्रेरणादायी ठरू
शकता.
Comments
Post a Comment