NEET 2020 ची अखेर परीक्षा झाली. काही विद्यार्थी आणि
पालक यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून केलेल्या मेहनतीचा सुटकेचा निःश्वास सोडला
असेल. परंतु आता खरी लढाई सुरू होत आहे. ती अत्यंत नियमाने, शिस्तबद्ध,
प्रमाणिकपणे लढल्यास यश हमखास. परंतु त्यात जर काही खोटेपणा,
शॉर्ट कट मारण्याचा प्रयत्न केला तर मात्र विजयची मुहूर्तमेढ
रोवताना अडचणी निर्माण होऊ शकतील.
काही विद्यार्थी जे खरे आहे तेच सरकारी कागदपत्रे
तयार करतात आणि ते खरे त्यालाभाचे मानकरी असतात त्यांना तो शासनाच्या नियमाप्रमाणे
मिळतो.
परंतु समाजातील काही दृष्ट् प्रवृत्ती हा लाभ
मिळवण्यासाठी मनामध्ये लोभ उत्पन्न करून चुकीचा मार्ग अवलंबता त्यांना फक्त साध्य
साधायचे असते त्यामुळे त्या प्रव्रुत्ती विचार तत्त्व यांना तिळाजळी देत साध्य
आर्थिक परिस्थितीच्या जोरावर साधता. आणि अत्यानंद साजरा करतात. परंतु हा आत्यानंद आताच्या
अत्याधुनिक युगात फार काळ साजरा करता येत नाही, कारण आता बरेच
क्षेत्रात डिजिटलायझेशन आले आहे. तिथे मात्र काळे कारनामे समोर येतात.
जुन्या काळात एक वाक्य बोलले जायचे "काही होत
नाही" परंतु या वाक्याने या कलयुगात बऱ्याच लोकांना फसवले त्यापासून सेलेब्रिटी, राजकारणी, खेळाडू, इतर सर्व
क्षेत्रातील काही बोटावर मोजण्याजोगती मान्यवर कंपनी वाचू शकली नाही. हे आपण आता
दैनंदिन जीवन माध्यमांमध्ये बघतच आहोत.
असेच काही वर्षांपूर्वी MBBS, BDS प्रवेश प्रक्रियेत इतर राज्यातील विद्यार्थ्यांनी-पालकांनी डोमेसाईल
म्हणजेच रहिवासी दाखले खोटे बनवून घेतले होते. आता त्यात कोण कोण सहभागी यात
आपल्याला जायचे नाही परंतु 500 ते 1000 दरम्यान ही संख्या निघाली तेंव्हा त्यातील काही विद्यार्थ्यांना सत्याच्या,
प्रामाणिकपणे, शिस्तबद्धपाने विचार करून वागले
असते तर त्यांचा प्रवेश त्यांच्या मार्क्स नुसार 100% झाला
असता पण या कलीयुगात लाभला ते बळी पडले, त्यांनी पण धाडस
केले असेल "काही होत नाही."
शेवटी त्यांना प्रवेश प्रक्रियेतून बाद करण्यात आले, त्यावेळेस त्यांनी केलेले अपार कष्ट एका चुकीमुळे शून्य झाले. पालकांच्या
एका चुकीमुळे मुलांचे नुकसान झाले याला जबाबदार कोण? तर लोभ,
माया यापासून नेहमीच दोन हात दूर राहिले तर असे प्रसंग जीवनात ओढवत
नाही.
या प्रसंगातून आपणही काही बोध घ्यावा हीच या
लेखमागील भावना, नाहीतर आहेच "काही होणार नाही."
Comments
Post a Comment