Skip to main content

इ.10, 12 वी बोर्ड परीक्षेत जास्त मार्क्स मिळवण्यासाठीचे 10 मार्ग? How to get good marks in board exam tricks.

अपयश हि यशाची पहिली पायरी असते त्यामुळे आयुष्यात कधी अपयश आले तर खचून न जाता आणखी जास्त ताकदीने प्रयत्न करा निश्चित यश तुमचेच असणार आहे. बोर्ड परीक्षेच्या तारीखा घोषित झाल्या. आता परीक्षेसाठी किती वेळ शिल्लक राहिला हे समजत आहे. त्यामुळे बोर्ड परीक्षेत विजयी व्हायचे असेल तर नियोजन केले तरच अपेक्षित ध्येय साध्य होऊ शकेल. याकरिता प्रामुख्याने काही मुद्दे विचारत घेऊन त्याची प्रामाणिकपणे, शिस्तबद्ध अंमलबजावणी केली तर निश्चितच अपेक्षित ध्येय दूर नाही.

१. शिल्लक दिवस ठरवणे:

बोर्ड परीक्षेच्या तारखा समजल्यापासून दिवस शिल्लक दिवस मोजून घेणे. आपल्याला असलेल्या प्रत्येक विषयाला यातील प्रत्येकी किती दिवस देता येतील ते ठरवणे.

२. वाचनउजळणी (Revision), टिपण्णी (Short Notes):

प्रत्येक विषयाकरिता दिवस ठरवल्यानंतर, त्याप्रत्येक विषयाच्या दिवसांत जवळपास 3 ते 4 वेळेस प्रत्येक धडा (chapter) हा वाचून झाला पाहिजे सोबत वाचताना त्या धड्याचे (chapters short notes) छोट्या टिपण्णी तयार केली पाहिजे त्यामुळे अवघड घटक (points) लक्षात ठेवण्यासाठी सोपे जातात. आणि परीक्षेला प्रश्नाचे उत्तर लिहिताना सहज मुद्देसूद आठवतात आणि त्यामुळे चांगले गुण (marks) मिळतात.

३. प्रश्नपत्रिका वेळ लावून सोडवणे (Solve Question Papers in time limit):

प्रत्येक विषयकरिता जो वेळ दिला आहे त्यात वाचन, उजळणी, टिपण्णी झाल्यानंतर पुढची महत्वाची प्रक्रिया येते झालेला अभ्यास तपासण्याची. यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका (Old Question Papers), सराव प्रश्नपत्रिका (Sample Practice Question Papers) वेळ लावून सोडवणे आणि त्याचे स्वयं मूल्यमापन करणे (Self Paper Checking) त्यामधून तीन महत्वाचे मुद्दे साध्य करणे. १. वेळेमध्ये प्रश्नपत्रिका सोडवता येते का? २. गुण (marks) किती मिळत आहे?

४. काय चुकले, काय बरोबर आले याचे पृथक्करण (Analysis) करणे.:

या तीन मुद्द्यावरून वेळेचे नियोजन (Time Management), अभ्यास कसा करावा? गुण (Marks) किती मिळत आहे? अपेक्षित गुण मिळत आहे का? उत्तर होय असेल तर अभ्यास करण्याची  अवलंबलेली पद्धत योग्य आहे, जर उत्तर नाही असेल तर अवलंबलेल्या अभ्यास पद्धतीमध्ये आपल्या पध्दतीने योग्य तो बदल करावा.  कोणते मुद्दे (Points) पुन्हा सराव करावा लागेल? याचे उत्तर मिळते, आत्मविश्वास (Confidence) वाढतो, अभ्यासात रुची (Intrest) वाढते.

५. मोबाईल, TV, Social Media:

आज असंख्य हुशार मुलं मोबाईल, TV, Social Media मध्ये Whats app, Facebook, YouTube, Instagram व इतर कारणांमुळे आपल्या आयुष्यातील बहुमुल्य वेळ वाया घालवत आहे. याचा खूप विपरीत परिणाम त्यांच्या बाल मनावर, आरोग्यावर होत आहे आणि यामुळे असंख्य समस्या निर्माण झाल्या आहे. त्यामुळे आपल्याला जर मनापासून वाटत आहे कि आपल्याला यश मिळवायचे आहे तर सर्वात प्रथम  मोबाईल, TV, Social Media मध्ये Whats app, Facebook, YouTube, Instagram यांना दूर ठेवा तरच आपण अपेक्षित ध्येय साध्य करू शकाल अन्यथा आपल्याला इच्छा असून सुद्धा आपण आपले ध्येय गाठू शकणार नाही. याकरिता पालकांनी सुद्धा आपल्या पाल्याचा अभ्यास नीट होण्यासाठी या गोष्टी घरात बंद केल्या पाहिजे.

६. योग्य आहार (Healthy Diet), पुरेशी झोप (Proper Sleep), व्यायाम (Exercise), योग (Yoga):

हे सर्व कष्ट घेत असताना सकाळी, संध्याकाळी वेळेवर जेवण, सरासरी 7 तास झोप, सकाळी ३०-४० मिनिट चालणे (Walking) किंवा पळणे (Running) सोबत ५-१० मिनिट व्यायाम, ५-१० मिनिट योगा की ज्यामुळे तब्बेत उत्तम राहते, आजरी उद्भवत नाही, दिवसभर प्रसन्न राहते, मनाची एकाग्रता वाढते त्यामुळे मनामध्ये इतर विचार येत नाही याचे देखील नियोजन खूप महत्वाचे आहे.

७. योग्य पुस्तके (Study Material):

शाळा, कॉलेज सुरू झाल्यापासून शेवट पर्यंत अभ्यासाचे पुस्तके (Study Material, Notes) एकच ठेवावे त्यामुळे सातत्याने वाचल्यास ते ३-४ वेळेस वाचताना लक्षात राहते, त्यातील वाक्यरचना, भाषा, मजकूर हा तोंड पाठ होत जातो. (Practice Makes Man Perfect). परंतु या विरुद्ध वेगळे पुस्तके जर वापरले तर त्यातील प्रत्येक पुस्तकातील भाषा, मजकूर, मांडणी यांच्यातील तफावत असल्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो आणि काही परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना त्याविषयाची आवड कमी होते, तसेच त्यांना त्याविषयाचे दडपण येऊ लागते कालांतराने त्याविषयाची भीती वाटू लागते त्यामुळे अभ्यासाची पुस्तके (Notes) निवडताना खूप काळजी घ्यावी आणि वर्षभर त्यातून अभ्यास करावा. काही परिस्थितीमध्ये शिक्षकांकडून नोट्स दिल्या जातात त्या जर विद्यार्थ्यांना समजत असेल तर पाठयपुस्तक आणि नोट्स याचे योग्य उपयोग करून अपेक्षित चांगले गुण मिळवू शकतात. यावरती मराठीमध्ये एक म्हण आहे एक ना धड भराभर चिंध्या. त्यामुळे थोडे करा पण perfect करा. SHORT BUT SWEET.

८. ताण-तणाव नियोजन:

बोर्ड परीक्षा म्हटलं कि थोडा ताण-तणाव हा काही विद्यार्थ्यांना असतो. काही विद्यार्थी सर्व अभ्यास व्यवस्थित वेळेवर पूर्ण करतात त्यांना याचा त्रास जाणवत नाही. मात्र जे विद्यार्थी अपेक्षा जास्त ठेवता मात्र कष्ट कमी घेतात त्यांना हा त्रास जाणवतो. त्यामुळे ताण-तणावापासून मुक्ती पाहिजे असेल तर अपेक्षा करणे सोडून द्या, जेवढे सहज कष्ट घेता येतील तेवढे घ्या. आणि जास्त गुण मिळवण्याची अपेक्षा सुद्धा करू नका म्हणजे ताण-तणाव जाणवणार नाही. अतिजास्त ताण-तणाव हा शरीराकरिता अपायकारक असतो. ताण-तणावपासून दूर राहण्यासाठी हसा, खेळा, अपेक्षा ठेऊ नका, अभ्यासाचे वेळापत्रक करावे मात्र सहज जेवढे शक्य होईल तेवढा अभ्यास करावा. चालणे, व्यायाम, योगासने करणे. तसेच घरातील वातावरण आनंदी असल्यास निश्चित फायदा होतो.

९. शिक्षकांचे मार्गदर्शन:

बोर्ड परीक्षेमध्ये अपेक्षित यश मिळवताना एक महत्वाचा घटक म्हणजे शिक्षकांचे मार्गदर्शन. विषयाचा अभ्यास कसा करावा? कोणत्या धड्याचा (Chapter) कसा अभ्यास करावा? याचे मार्गदर्शन विषय शिक्षकांकडून घ्यावे. काही घटक (Points) अवघड वाटत असतील तर ते पुन्हा विषय शिक्षकांकडून समजून घ्यावेत. पेपर सोडवताना कसा सोडवावा? कोणते घटक परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहे, गुणदान पद्धत (Marking scheme), प्रश्न पत्रिकेत प्रश्न विचारण्याची पद्धत, हे सर्व काळजीपूर्वक समजून घ्यावी त्यामुळे पेपर सोडवताना काय लिहिणे अपेक्षित आहे हे समजते. त्यामुळे अपेक्षित गुण मिळवताना निश्चित फायदा होतो.      

१०. कष्ट करणे आणि ध्येय गाठण्याची जिद्द:

कोणतेही गोष्ट साध्य करायची असेल तर त्याला कष्ट केल्याशिवाय पर्याय नसतो. Success has no shortcut. म्हणजेच यशाला कष्टाशिवाय जवळचा मार्ग नाही. त्यामुळे अपेक्षित यश गाठायचे असेल तर कष्ट घेण्याची तयारी ठेवावी लागते. त्याचे व्यवस्थित नियोजन केले, त्यात सोबत आवड निर्माण झाली तर कष्ट करताना त्रास देखील जाणवत नाही. आनंदाने कोणतेही काम केले तर अवघड वाटत नाही. त्यामुळे आपले ध्येय साध्य करायचे असेल तर कठोर परिश्रमाशिवाय आपल्याला पर्याय नाही हे जेव्हा आपल्याला समजते त्यावेळेस आपल्या एक प्रकारची कष्ट घेण्यासाठी ऊर्जा मिळते आणि त्यातून आपले कार्य पूर्ण होत जात असते आणि असे ध्येय आपण साध्य करत गेलो तर पुढचे ध्येय साध्य करताना आधीचा आत्मविश्वास पण सोबत असतो.  त्यामुळे नियोजन बद्ध अभ्यास करत राहा, फळाची अपेक्षा ठेऊ नका. कष्टाचे फळ निश्चित मिळते.

वरील बाबींचे योग्य पद्धतीने अवलंब केला तर निश्चितच अपेक्षित यश संपादित करता येते. 

Comments

Popular posts from this blog

NEET 2020 परीक्षा हॉलमध्ये जाताना.

NEET 2020 13 सप्टेंबर 2020 रोजी होत आहे. त्याचे प्रवेश पत्र NTA NEET 2020 अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. NEET 2020 Admit Card काळजीपूर्वक Download करून दिलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा. परीक्षा देत असताना सोबत काय बाळगू शकता त्याच सोबत सोबत काय बाळगू नये या संदर्भात सर्व सूचना दिल्या आहे त्याचे तंतोतंत पालन करा. NEET 2020 परीक्षा देताना सोबत मास्क , हॅन्डग्लोज , सॅनिटायझर 50 मिली पर्यंत सोबत बाळगू शकता. त्याच सोबत गरज असेल तर पारदर्शक पिण्याचे पाणी बाटली सोबत बाळगू शकता. NEET 2020 Admit Card सोबत आयकार्ड गरजेचे आहे. आयकार्ड कोणते त्याविषयी सविस्तर माहिती NEET 2020 Admit Card मध्ये दिलेली आहे. कोव्हिड 19 च्या परिस्थितीमुळे सामाजिक अंतर राखणे अत्यंत गरजेचे आहे त्याचे प्रत्येक विद्यार्थ्याने काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. परीक्षा केंद्रावर नोंदणी केली जाणार आहे , त्याच सोबत शरीराचे तापमान देखील घेतले जाणार आहे. परीक्षा हॉल विद्यार्थ्यांनी प्रवेश करण्यापूर्वी आणि परीक्षा हॉल सोडल्यानंतर सॅनिटाइझ केला जाणार आहे. परीक्षा हॉलमध्ये जाताना सामाजिक अंतर राखण्याच्या दृष्टी...

या वर्षी NEET 2020 झालेले बदल.

या वर्षी  NEET  झालेले बदल. या वर्षी  NEET  विद्यार्थ्यांनी  NTA NEET  अधिकृत संकेतस्थळावरून  NEET Admit Card Download  करून प्रिंट घेतली असेल. त्यावर दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे सर्व परीक्षार्थींना पालन करावे. आपल्या  NEET  Admit Card  मध्ये जो वेळ आपल्याला दिला आहे त्यावेळामध्ये आपण आपल्या  NEET Exam Centres  परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. परीक्षा केंद्रावर पोहचल्यानंतर त्याठिकाणी एक नोंदणी खोली असणार आहे. त्याठिकाणी परिक्षार्थींचे तापमान तपासले जाणार आहे ,  जर परीक्षार्थींचे तापमान  37.4  ℃  /99.4 F  कमी असेल त्या परीक्षार्थींना पुढे तपासणी करिता पाठवले जाणार. धातू-शोधक यंत्रामार्फत सामाजिक अंतराचे नियम राखून तपासणी केली जाणार. यदाकदाचित काही विद्यार्थ्यांचे तापमान तपासताना  37.4  ℃  / 99.4F  पेक्षा जास्त असेल अश्या विद्यार्थ्यांना एका खोलीमध्ये सामाजिक अंतराचे नियम राखून  15-20  मिनिट बसवले जाईल त्यादरम्यान तापमान कमी झाले तर पुढे तपासणी कडे पाठवले जा...

MHTCET 2020 महाराष्ट्र शासन राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई दिनांक 25. 10. 2019 जाहिर सूचना.

MHTCET 2020 महाराष्ट्र शासन राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई दिनांक 25. 10. 2019 जाहिर सूचना. शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी प्रथम वर्ष अभियांत्रिकी तसेच औषध निर्माण शास्त्र तसेच कृषी पदवी म्हणजेच तसेच कृषी पदवी म्हणजेच इंजिनीअरिंग फार्मसी आणि एग्रीकल्चर या अभ्यासक्रमासाठी एमएचटी-सीईटी या अभ्यासक्रमासाठी (एमएचटी-सीईटी) MHTCET 2020 सामायिक प्रवेश परीक्षा गतवर्षीप्रमाणे 2020 मध्ये ऑनलाईन पद्धतीने पीसीएम व पीसीबी म्हणजेच फिजिक्स केमिस्ट्री मॅथेमॅटिक्स व फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी असा दोन गटांमध्ये एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये घेण्यात येणार आहे एकापेक्षा अधिक सत्र याचा अर्थ असा सकाळ सत्र दुपार सत्र म्हणजेच मॉर्निंग सेशन आणि आफ्टरनून सेशन परीक्षेचा कालावधी साधारणपणे 16 ते 20 दिवसांचा असून सदर परीक्षा मे 2020 महीन्याच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या आठवड्यात घेण्याचे प्रस्तावित आहे सदर परीक्षेचा कालावधी हा इतर परीक्षा व विद्यापीठांच्या परीक्षेचा कालावधी लक्षात घेऊन ठरविण्याचे विचाराधीन आहे. या परीक्षेचा निकाल तज्ञ समितीने केलेल्या नोरमलाईझेशन फॉर्मुला नुसार लावण्यात येईल ...